Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०३/२०२२

Article about two different opinions about The Kashmir Files Movie

काश्मिर फाईल्स , मते मतांतरे  

विधानसभा , लोकसभा या सभागृहात झोपणारे काही महाभाग नेते सुद्धा आपल्याकडे आहेतच , आपले एक माजी पंतप्रधान सुद्धा कित्येकदा डुलक्या मारायचे. ज्यांच्या हाती देशाचा , राज्याचा कारभार जनतेने दिला असतो, असे असतांना त्यांना सुद्धा कशी काय झोप लागते ? मुळात पैसे खर्चून जो व्यक्ती चित्रपट पहायला जातो तो काय चित्रपटगृहात झोपण्यासाठी ? कश्मीरबाबतचे वास्तव चित्रण, काश्मिरी पंडीतांकडे तत्कालीन सत्ताधा-यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष याचे वास्तव या चित्रपटात दाखवल्याने आपल्या देशातील वोट बँक सांभाळण्यासाठी लांगूलचालन करणा-या राजकारण्यांची झोप उडाली आहे हे मात्र निश्चित म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत.

काश्मिर फाईल्स हा वास्तववादी चित्रपट सध्या चर्चेत आहे. काश्मिर मध्ये 1990 मध्ये काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारास , त्यांच्यावर आलेल्या अनेक आपत्तींचे , अमानुष वागणूकीचे वास्तववादी चित्रण विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत अनेक लेख लिहिल्या गेले. अनेक विचार प्रकट होत आहेत. तमाम सच्च्या राष्ट्रप्रेमी जनतेच्या पसंतीस हा चित्रपट उतरला असतांना व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे विविध लोक त्यांच्या-त्यांच्या सोयीनुसार,  वैयक्तिक, राजकीय भुमिकेमुळे  विविध स्वरूपाची मते व्यक्त करीत आहेत. तसेच हा चित्रपट, याला होणारी जनतेची गर्दी, चित्रपटाने आज पर्यन्त केलेली 200 कोटींपेक्षाही जास्त कमाई , हे सर्व अनेकांना का कोण जाणे खुपत आहे. अशाच वाचनात आलेल्या दोन मतांबाबत.  

मत क्र. 1 -  "काश्मीर  फाईल्स चित्रपट पाहतांना मध्यंतरानंतर माणूस झोपी जातो, फुकट शो ठेवले तरी तरुण हा चित्रपट पाहण्यास जात नाही." हे पहिले मत सत्ताधारी मविआच्या एका आमदार महोदयांनी व्यक्त केलेले मत  आहे. प्रथम या मताविषयी. या मतानुसार, "चित्रपट पाहतांना मध्यंतरानंतर माणूस झोपी जातो" असे जे म्हटले आहे त्यात काही तथ्य वाटत नाही. आता सिनेमागृहात कोण झोपी गेले आहे, व कोण चित्रपट पाहत आहे हे सिनेमागृहात प्रत्येकाच्या जवळ जाऊन पाहिल्यावरच लक्षात येईल, अशी पाहणी कुणी केली आहे का ?  मी स्वत: हा चित्रपट पाहण्यास गेलो असता माझ्या मागील,पुढील,शेजारील सिटवरील कुणीही मला झोपलेले आढळून आले नाही तर काश्मिरी पंडीतांवर होत असलेले अत्याचार पाहून हुंदके व उसासे मात्र ऐकू येत होते. हा चित्रपट पाहतांना कुणालाच झोप सुद्धा लागणे तर सोडा उलट झोप उडेल असे प्रसंग यात चितारले आहे,  पण चित्रपटागृहात कुणी झोपल्याचे जाऊ द्या, आपल्या विधानसभा, लोकसभा या सभागृहात झोपणारे काही महाभाग नेते सुद्धा आपल्याकडे आहेतच , आपले एक माजी पंतप्रधान सुद्धा कित्येकदा डुलक्या मारायचे. ज्यांच्या हाती देशाचा , राज्याचा कारभार जनतेने दिला असतो, असे असतांना त्यांना सभागृहात झोप लागते तरी कशी ? तसेच उपरोक्त विधानात "फुकट शो ठेवले तरी तरुण हा चित्रपट पाहण्यास जात नाही",  असे म्हटले आहे आता याची पडताळणी खरोखर फुकट शो  ठेऊनच करावी लागेल तेंव्हा विधानकर्त्यांने असा एखादा शो आयोजित करून पहावा तेंव्हाच हे विधान खरे आहे की नाही याची पडताळणी होईल असे वाटते. मुळात पैसे खर्चून जो व्यक्ती चित्रपट पहायला जातो तो काय चित्रपटगृहात झोपण्यासाठी ? वोट बँक केन्द्रित राजकारण जे करतात, त्यांना आपली वोट बँक नाराज न व्हावी यासाठी तसेच कश्मीरबाबतचे वास्तव चित्रण, काश्मिरी पंडीतांकडे तत्कालीन सत्ताधा-यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष याचे वास्तव या चित्रपटात दाखवल्याने आपल्या देशातील वोट बँक सांभाळण्यासठी लांगूलचालन करणा-या राजकारण्यांची झोप उडाली आहे हे निश्चित म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत.

मत क्र. 2 -  या चित्रपटात पोलिस अधिका-याची भूमिका वठविणा-या पुनित इस्सर या कलाकाराचे हे दुसरे मत आहे. नागपूर मध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे खेळ माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने नि:शुल्क दाखवण्यात येत आहे व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणजेच पहिल्या मताचे अर्थात "फुकट शो ठेवले तरी तरुण हा चित्रपट पाहण्यास जात नाही" याचे इथेच खंडन होते. नागपूर मध्ये  काश्मीर फाईल्स च्या नि:शुल्क शो ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी पुनित इस्सर नागपूरला आले होते. "काश्मीर मध्ये झालेल्या नरसंहाराचा कधी कुण्या चित्रपटातून साधा उल्लेखही झाला नाही, हृदयाला स्पर्श करणारे चित्रपट मोजके असतात, हा चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा आहे, चित्रपट बनवण्यास 5 वर्षे लागली, 750 हून अधिक मुलाखती घेण्यात आल्या, चित्रपटात गाणी नाही, मसाला  नाही तरीही हा चित्रपट विक्रम प्रस्थापित करीत आहे " असे पुनित इस्सर यांचे मत आहे. उपरोक्त दोन मते ही परस्परविरोधी मते आहेत.

 दुस-या मताबाबत कुणी असेही म्हणेल की पुनित इस्सर यांनी चित्रपटात भूमिका केली आहे ते चित्रपटाच्या बाजूनेच बोलणारच. पण तरीही त्या बोलण्यातून वास्तवता प्रतीत होते.

 तर पहिल्या मतातून मात्र आपल्याच देशातील जनतेवर झालेल्या अत्याचारास प्रकट करणा-या चित्रपटास  स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी, राजकीय भुमिकेसाठी अयशस्वी चित्रपट असल्याचे दाखवणे यातून काश्मिरी हिंदुंबाबतची अनास्थाच दिसून आली आहे. 

अशी ही दोन्ही मते असली तरी कुणाचे काहीही मत असो , कुणी काहीही बरळत असो हा चित्रपट मात्र जनता जनार्दनाच्या पसंतीस  उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

१८/०३/२०२२

Memory of a sweet song 'Kitni Khubsurat Yeh Tasweer Hai' about Kashmir on the release of 'The Kashmir Files' movie

 ...ये कश्मीर है

      नुकताच कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. या निमित्ताने काश्मीर बद्दलचे वर्णन सत्तरच्या दशकात आलेल्या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसाल या अमिताभ बच्चन, विनोद मेहरा व राखी अभिनीत व आर. डी. बर्मन या चतुरस्त्र संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाततील  "कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है" या गीताचे स्मरण झाले. खरेच ही तस्वीर कायमची खुबसुरतच राहायला हवी.      

    नुकताच काश्मिर फाईल्स हा काश्मिरी पंडीतांवर कसा अन्याय झाला हे कथन करणारा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती आणि ती होणे स्वाभाविक सुद्धा आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना काश्मिर मधून आतंकवादयांनी निष्कासित केले. आपली घरे, जमीन, सफरचंदाच्या बागा सगळे सोडून काश्मिरी पंडीत आपल्याच देशात निर्वासित झाले, देशात इतस्ततः विखुरले गेले परंतू देशातील जनता अनभिज्ञ होती, काश्मिरी पंडीतांवर होणारे अत्याचार इतर भागातील जनतेपर्यंत पोहचत नव्हते किंवा हेतुपुरस्सरपणे पोहचू दिले जात नव्हते, तत्कालीन माध्यमांनी या घटनेस  प्रसिद्धी देण्याचे टाळले. तथाकथित सेक्युलर आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक, एरवी मानवतावादाच्या गप्पा हाणणारे तथाकथित बुद्धिजिवी काश्मिरी पंडीतांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वेळी मात्र मूग गिळून गप्प होते.  तदनंतर  अभाविप व इतर काही संघटनांनी श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे आंदोलन छेडले तेंव्हा या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात होती. परंतू या आंदोलनामुळे काश्मिरची हाताबाहेर जात असलेली परिस्थिती देशवासियांना कळण्यास मोठा हातभार लागला. तत्कालीन सरकारवर सुद्धा याचा काही प्रमाणात परीणाम झाला असावा. 

    काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचाराचे दाखले कश्मीर फाईल्स या चित्रपटातून दिले आहे. काश्मीर म्हणजे आपल्या भारताचे नंदनवन, भारताच्या या निसर्ग संपन्न ऊत्तर टोकाच्या भूमीस म्हणूनच स्वर्गाची उपमा दिली गेली आहे. ऋषीमुनींनी जिथे तपश्चर्या केली, काश्मिरवर आधारित राजतरंगिणी सारखा ग्रंथ, व्याकरण रचले गेले, 14 व्या शतकापर्यंत जिथे मुस्लिम पाऊलही पडले नव्हते, त्या काश्मीरच्या रम्य, पवित्र, स्वर्गीय भूमीवर पाकीस्तान पुरस्कृत कट्टर धर्मांध दहशतवादयांनी पाय पसरवले, फुटीरतावादी संघटना पोसल्या जाऊ लागल्या. भारत स्वतंत्र झाल्यावर ऐंशीच्या दशकापर्यंत काश्मीर शांत होते, लोक पर्यटनास येत होते, चित्रपटांचे चित्रीकरण येथे होत होते त्या चित्रपटांच्या कथांतून, गाण्यातून काश्मिरचे सुंदर असे वर्णन होत असे, काश्मिरची दृश्ये पडद्यावर बघून दर्शक सुखावत असे. 

      काश्मिर बद्दलचे असेच वर्णन सत्तरच्या दशकात आलेल्या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसाल या अमिताभ बच्चन, विनोद मेहरा व राखी अभिनीत व आर. डी. बर्मन या चतुरस्त्र संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील  "कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है" या गीतातून गीतकार आनंद बक्षी यांनी व्यक्त केले आहे. बेमिसाल हा खुप सुंदर कथानक असलेला चित्रपट आहे परंतू आज केवळ या चित्रपटातील गीताबाबतच. चित्रपटाबाबत पुन्हा कधी तरी. तर "कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है" या गीतात गीतकाराने काश्मीरचे यथार्थ वर्णन केले आहे. हे वर्णन करतांना गीतकार म्हणतो,

"परबतो के दरमिया है, 

जन्नतो के दरमिया है,

आज के दिन हम यंहा है|

साथी ये हमारी तकदिर है ||"

     खरेच स्वर्गीय पर्वत व रमणीय दृश्ये असणा-या काश्मिर सारख्या ठिकाणी जाणा-यास आपण भाग्यवान असल्याची प्रचिती येते. पण याच स्वर्गीय ठिकाणी नतद्रष्ट आतंकवादयांनी बंदुकांच्या गोळ्या, बॉम्बचे वर्षाव, जवानांना लक्ष्य करणे, निष्पाप लोकांना मारणे यांनी उच्छाद मांडला, लहान-लहान मुलांची माथी भडकवून त्यांच्या मनात व्देशाचे विष भरवून त्यांना अतिरेकी बनवले जाऊ लागले , दहशतवादाची जणू एक फॅॅक्टरीच काश्मिर मध्ये सुरु झाली व या नंदनवनास उध्वस्त करू लागली, या निसर्गानी ओतप्रोत भूमीस या कट्टरतावाद्यांनी भकास बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला , येथील शांती नष्ट केली. 

   इस जमीन से, आसमान से,

जाना मुश्किल है यंहा से |

तौबा ये हवा है या जंजीर है ||

गीताच्या वरील ओळीत येथे पर्यटनास आलेल्यास येथील हवा, येथील आकाश सोडून जाणे कसे जीवावर येते, येथील आल्हाददायी हवेने त्याला जणू एखाद्या साखळीने बांधून ठेवले आहे असे वाटते. 

    2019 मध्ये मोदी सरकारने 370 कलम रद्द केल्यावर आता काश्मिर घाटीत बदल होण्यास सुरुवात झाली आहे खरी. तरीही दहशतवादी अधून-मधून डोके वर काढतच असतात. 1980 च्या पुर्वीच्या स्थितीसारखी स्थिती असलेले काश्मिर हवे असल्यास आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. दहशतवाद विरोधी कायदा आहे परंतू नव तरुणांना दहशतवादी बनण्यापासून कसे परावृत्त करता येईल ?, त्यासाठी नवीन काही योजना आखता येऊ शकते  का?, जिथे या तरुणाची माथी बालवयातच भडकवली जातात त्या ठिकाणांबाबत काही उपाययोजना करता येईल का , त्या ठिकाणांवर काही निर्बंध लावता येऊ शकतील का ?  या तरुणांना दहशतवादी बनण्यापेक्षा मुख्य प्रवाहात कसे आणता येईल ? त्यांच्या पालकांचे समुपदेशन कसे करता येईल ?, काश्मीरच्या विद्यार्थ्यांना भारतात इतरत्र फिरण्यास आणून त्यांना आपला देश दाखवण्याची एक चांगली योजना होती , ती अद्याप  सुुरु आहे की नाही ज्ञात नाही परंतू सुरु असल्यास त्या योजनेत आणखी काही सुधारणा करता येतील का ? काश्मिर मध्ये व्यापार करण्यास ईच्छूकास संरक्षण कसे देता येईल ? या सर्व बाबींवर विचारपूर्वक चिंतन करून सर्वांना सोबत घेऊन विचार होणे, झटपट निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वेळेला सुद्धा महत्व द्यावे लागेल कारण उद्या कशी परिस्थिती येईल याची निश्चिती नाही. काश्मिर भागात पर्यटनास आणखी चालना कशी देता येईल? हे सुद्धा लक्षात घेणे जरुरी आहे. उपरोक्त बाबींवर त्वरेने कारवाई झाल्यास , निर्णय झाल्यास  तसेच दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाले तरच  पुनश्च 

कितनी खूबसूरत ये तस्वीर है 

ये कश्मीर है |

 या गीतासारखी परिस्थिती निर्माण होईल. व काश्मिर या नंदनवनात पुनश्च शांती , आनंद प्रस्थापित होईल. पुर्वी सिनेमासाठी हिंदीत  तस्वीर हा शब्द वापरायाचे. त्यानुसार काश्मिर फाईल हा चित्रपट जसा एक सुंदर तस्वीर आहे तशीच प्रत्यक्षातील काश्मीरची सुद्धा खुबसुरत अशीच तस्वीर असावी हीच समस्त भारतवासियांची मनोकामना आहे.

 

१०/०३/२०२२

Article about recent politics, politician in Maharashtra and India

 इनको देश की क्या पडेली है ?

मी  त्याच विचारात मार्गक्रमण करत होतो बाजूला रस्त्यावर विक्रीसाठी स्टडी टेबल , लाकडी खेळणे विक्रीस आलेले लोक होते, त्यांची उघडी नागडी बालके खेळत होती , रस्त्यावरच चूल पेटली होती, पोटाची खळगी भरण्यासाठी ते पर राज्यातून आले होते. अल्पसा का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावत होते. त्यांना, त्यांच्या लहानग्या मुलांना पाहून, त्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या चौथ्या तरुणानी म्हटलेले, "राजनीतीवाले ये लोग अपने स्वार्थ के लिये राजनीती मे आते है, इनको देश की क्या पडेली है ?" हे वाक्य मला पुन्हा-पुन्हा आठवत होते.

     एक दिवस मी पायी फिरण्यासाठी म्हणून निघालो. माझ्यासमोर काही महाविद्यालयीन तरुण चालत होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्या गप्पांमध्ये युक्रेन , महाराष्ट्र सरकार , केंद्र सरकार या विषयी चर्चा सुरू होत्या. एक म्हणाला अबे वो एडिटर था, कौन है बे वो ? , दुसरा त्वरीत उत्तरला वो दिल्ली मे है उस की बात कर रहा न तू , अरे हां न यार दिन निकला की शुरू हो जाता न बे वो , उसको चुनके दिया तो विधायक लोगो के जो काम है वो करता होगा की नाही कुछ ? त्यावर तिसरा तरुण म्हणाला अबे सभी पार्टी के लोग पिछले महीनेसे बस एक के पिछे एक प्रेस कॉन्फरन्स ले रहे  है, और बस एक दुसरे पे इल्जाम लगाना शुरू है | लोग इनको जिस काम के लिये चुनके देते वो ये भूल जाते और देश का काम करने की बजाय ये आपना ज्यादा समय तो एक दुसरे के घोटाले निकालने मे और प्रेस कॉन्फरन्स लेनेमे ही बिताते बटे ! त्यावर चौथा म्हणाला अबे छोडो न बे इन लोगो की बाते, ये तो चुनके आने के बाद खुद का और खुद के परीवार का फायदा कर लेते है, जनता गयी .....| राजनीती वाले ये लोग अपने स्वार्थ के लिये राजनीती मे आते है, इनको देश की क्या पडेली है ?

          या संवादानंतर ते तरुण वेगळ्या दिशेने पुढे गेले. पण त्यांच्या राजकारणाबाबतच्या निराशापुर्ण व वास्तववादी गप्पा मात्र मला विचारात पाडून गेल्या. सध्याचे राजकारण, लोकप्रतिनिधी यांच्याविषयीचे जनतेचे मत हे आता खरेच अतिशय खराब झाले आहे. स्वार्थासाठी काहीही करणे, निवडून आल्यावर विधानसभेत खोटी कागदपत्रे सादर करणे, कर्मचा-यांना मारहाण करणे, सत्ता हाती आल्यावर कायद्याच्या रक्षकांना हाताशी धरून गैर कायदेशीर कृत्ये करणे, देशद्रोहयांशी हातमिळवणी करणे, दोन/तीन लग्ने करणे, तरुणींना त्यांना आत्महत्येस भाग पडावे असे फसवणे, देश कार्य, विकास सोडून एकमेकांना कसे अडकवता येईल या बाबत नाना क्लृप्त्या शोधणे त्यासाठी सरकारी यंत्रणा दावणीस बांधणे असे सांप्रत कालीन व पुर्वीचे आणखी कितीतरी दाखले देता येतील. अर्थात सर्वच राजकारणी लोक सारखेच असतील असेही नाही काही अपवाद नक्कीच आहे. पण ती संख्या अगदीच नगण्य. भारतीय लोकप्रतिनिधींना सकारात्मक, विकास केंद्रीत असे राजकारण करताच येत नाही का ? करायचेच नाही का ?  त्यांना याबाबत कुणी सल्ला वगैरे देते की नाही ? त्यांच्यावर होणारे आरोप, त्यांचे घोटाळे हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटते ? अशा प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळू शकतात का ? सतत पुर्वी होऊन गेलेले राजे , महापुरुष यांची निव्वळ नांवे घेऊन, जनतेला त्यांच्या आदर्श गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करणे, जनतेतील जातीभेदास खतपाणी घालणे व ज्या महापुरुषांची नांवे हे घेतात त्या महापुरुषांनी घालून दिलेल्या आदर्शाच्या अगदी विरुद्ध असे आचरण करणे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांची पायमल्ली करणे अशी या लोकप्रतिनिधींची त-हा असते. कालच्या राज ठाकरे यांच्या 2 एप्रिल 2022 च्या भाषणाचा ट्रेलर असलेल्या भाषणात त्यांनी जे सध्याच्या राजकारणा बाबत भाष्य केले त्यात खरोखर तथ्य आहे. त्यांनी, "आताच्या मुलांना हल्लीचे राजकारण हे सध्या सुरू आहे असेच असेल असे वाटत असावे" असे जे म्हटले त्याचीच प्रचिती मला त्या दिवशी त्या तरुण मुलांच्या ऐकलेल्या गप्पांमधून पुर्वीच आली होती. निव्वळ उचलली जिभ लावली टाळूला सारखी नसता वाद निर्माण करणारी भाष्ये करायची व नवीन वाद निर्माण करायचा, व मिडीया तेच-तेच दाखवून लोकांचे डोके खराब करतो. सभागृहात विकास, नवीन ठराव आदींवर चर्चा होण्याऐवजी भलत्याच गोष्टींवर खडाजंगी होत राहते. याला कधी आळा बसणार ? कसा बसणार ? सत्तेसाठी विचारसरणी सोडून एकत्र यायचे आणि सत्तेव्दारे मग स्वत:चा , कुटुंबियाचा कसा लाभ होईल हेच बघत राहायचे. सध्याच्या राजकारणातून राष्ट्र केन्द्रित राजनीती हद्दपार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेत्यांना त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेचा ताबडतोब विसर पडतो , माझे राष्ट्र विकसित करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिले आहे याचे भान तो सत्ताप्राप्ती नंतर विसरतो, सत्ता मग राष्ट्राऐवजी स्व केंद्रित होते व स्वत:चा फायदा तेवढा पाहिला जातो , देशाचे कुणाला काय पडले आहे ?                        त्या तरुणांचे राजकारणाविषयीचे, सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबतचे ते संभाषण उद्विग्नतेचे होते, तरुण पिढी सांप्रत राजकारण व लोकप्रतिनिधी यांचे बाबत किती निराश आहे हे व्यक्त करणारे होते. मी  त्याच विचारात मार्गक्रमण करत होतो. बाजूला रस्त्यावर विक्रीसाठी स्टडी टेबल, लाकडी खेळणी विक्री करण्यास आलेले लोक होते, त्यांची उघडी नागडी बालके खेळत होती, रस्त्यावरच त्यांची चूल पेटली होती, पोटाची खळगी भरण्यासाठी ते पर राज्यातून आले होते. अल्पसा का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावत होते. त्यांना, त्यांच्या लहानग्या मुलांना पाहून, त्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या चौथ्या तरुणानी म्हटलेले, "राजनीतीवाले ये लोग अपने स्वार्थ के लिये राजनीती मे आते है, इनको देश की क्या पडेली है ?" हे वाक्य मला पुन्हा-पुन्हा आठवत होते, 

०३/०३/२०२२

Article on the occasion of World Wildlife Day 03/03/2022

लहान वन्यजीवांच्या संवर्धनाचे काय ? World Wildlife Day Special 

वाघबिबटअस्वलहरीणरोही यांची 

संख्या तेजीने वाढत असतांना मात्र रान ससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट) हे सर्व लुप्त होण्याच्या 

मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा 

होत आहे ?, कोण करत आहे वनखात्याचे 

इकडे लक्ष आहे की नाही जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठी जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे 

लहान वन्यजीव नाहीत का ?


अनेक प्रकराच्या विविधतेने नटलेल्या भारतात विविध वन्यजीव सुद्धा आढळतात. रामायण –महाभारत काळात वन्यजीव सुखाने ऋषी मुनींच्या आश्रमा जवळ भयमुक्त असे राहात असत. पुढे आधुनिक काळात भारतातून इंग्रजांच्या गच्छंतीपुर्वी मुघल सम्राट व इंग्रज यांनी वारेमाप शिकारी भारताच्या समृद्ध जंगलातून केल्या होत्या. शिकार करणे म्हणजे तत्कालीन मनोरंजनाचे साधन होते , एक खेळ होता. अनेक भारतीय राजे-महाराजे शिकारीसाठी म्हणून दूर-दूर जात, जंगलातच मुक्काम ठोकत. शिकार झाली की वाजत गाजत गावात येत व मोठ्या हौशेने वन्यप्राण्यांचे मुंडके आपल्या दरबारात लावत. त्यांचे कातडे आसन म्हणून वापरत. अशाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारींमुळे पट्टेदार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. यावर उपाय योजना म्हणून वाघांचे संवर्धन, टायगर प्रोजेक्ट निर्माण झाले. शिकारीवर बंदी आणली गेली, अभयारण्ये निर्माण केली गेली. जंगल कायदा मात्र तोच इंग्रजांनी तयार केलेला. अनेक मोठ्या जीवांचे संवर्धन झाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल, हरीण व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या एवढी वाढली की, शहरात बिबट व अस्वल घुसू लागली तर हरणे व रोही शेतक-यांची डोकेदुखी झाली. परंतू हे घडण्याचे कारण सुद्धा मानवच आहे कारण ज्या जमीनीवर पुर्वी वन्यजीवांचा हक्क होता त्या जमिनीवर आता मानवाने कब्जा केला आहे. त्यांच्याच जमिनीवर ते आले की आपल्याला ते आपल्या हद्दीत घुसले असे वाटते. कर्नाटकातील दोडामार्ग येथील हत्तींच्या मार्गात मानवी वस्त्या, शेती झाल्याने त्यांच्या पुर्वीच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवामुळे मग त्यांना निर्घुणपणे मारण्याच्या घटना सुद्धा घडतात. भारतात कितीतरी एकर जमीन जंगलांनी व्यापली आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त वन जमीन आपल्या विदर्भात आहे. परंतू निव्वळ जंगले असून चालणार नाही तर तेथील वन्यजीव संपदा सुद्धा टिकली पाहिजे ती टिकण्यासाठी सरकारसोबत जनतेला, वन्यजीव प्रेमींना सुद्धा अग्रेसर व्हावे लागेल. तसेच वनविभाग व सरकार यांचे लक्ष केवळ मोठ्या वन्यजीवांच्या संवर्धनाकडेच असल्याचे दिसते. एकीकडे वाघ, बिबटअस्वलहरीणरोही यांची संख्या तेजीने वाढत असतांना मात्र रान ससे, तितर, बटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट)  हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा होत आहे ?, कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष

आहे की नाही ? जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठी , जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे लहान

वन्यजीव नाहीत का ? तर लहान वन्यजीव सुद्धा आवश्यकच आहे परंतू याकडे सरकारचे लक्ष नाही असे जाणवते. जंगल भ्रमंतीस गेल्यावर रानससा मुळी दिसतच नाही किंवा कुणाला दिसल्याचे ऐकीवात येत नाही. जंगल भ्रमंती करून आल्यावर समाज माध्यमांवर लोक जे फोटो पोस्ट करतात त्यात कधीही रानससा , साळीन्दर , टोयी (लहान पोपट ) तितर यांचे फोटो शेअर केल्याचे दिसत नाही. वन्यजीवांची जेंव्हा शिरगणती होते त्यात सुद्धा या प्राण्यांची संख्या दिलेली दिसत नाही. वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिकारी व दुर्लक्ष यामुळे आज चित्त्यासारखा चपळ , तेज , सुंदर प्राणी भारतातून केंव्हाच लुप्त झाला आहे. आता सरकारने काही चित्ते आफिकेतून आणले आहेत खरे परंतू त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आज कित्येक फुलपाखरांच्या जाती लुप्त झाल्या आहेत.

 आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त लहान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सुद्धा पाऊले उचलली  गेली पाहिजे, वन्यजीवप्रेमींनी सुद्धा यावर विचार करायला हवा.

१०/०२/२०२२

Veteran Singer Lata Mangeshkar passes away , tribute article about her

  लता नांवातच ताल होता


काय तो उंच चढणारा,गोडव्यात मधालाही मागे टाकणारा आवाज होता. आकाशवाणीवर सकाळी ऐकलेले लता दीदींनी गायलेले अभंग, देशभक्तीपर गीते व नतंर हजारो जुनी फिल्मी गाणी ऐकत-ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलेच आम्ही. असंख्य गाण्यातील कोणत्या गाण्यांबद्दल लिहावे? “ये मुलाकात एक बहाना है” खानदान चित्रपटातील हे गीत कितीही पुनरावर्तने होवोत कंटाळा तो मुळी येतच नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या लता दिदींनी “मै हुं अपने सनम की बाहो मे, मेरे कदमो तले जमाना है” हा आपल्या सोबत्या सोबत असलेला भाव शब्दांत किती सुंदर व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर या सुविख्यात गानसम्राज्ञी 6 फेब्रुवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेल्या. अखिल भारत शोकसागरात बुडाला. लता दीदींना कोरोनाची लागण झाल्यापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. जेंव्हा त्यांच्यावर Aggressive Therapy सुरु झाली तेंव्हा मात्र काळजाचे ठोके चुकू लागले होते. अखेर त्यांच्या दु:खद निधनाची बातमी येऊन धडकलीच व अपरिमित असा शोक समस्त भारतीयांना झाला. आपल्या गोड आवाजाने सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासून ते अगदी काल-परवा पर्यंतच्या काजोल, ग्रेसी सिंग सारख्या नायिकांना आपला आवाज देणा-या लता दीदी या साध्या, लाघवी बोलणा-या व सिनेसृष्टीतील कलाकार, खेळाडू, राजकारणी यांच्याशी सुहृदयी संबंध राखणा-या लता दीदींचे जाणे म्हणजे संगीत क्षेत्र व सिनेसृष्टीची न भरून निघणारी हानी होय. वडील मा. दिनानाथ यांच्या नंतर कुटुंबाची देखभाल करत, लहान भावंडाना सुद्धा चांगली शिकवण देत पुढे आणत त्या स्वत:चे सुद्धा करीअर करीत होत्या. आजकालच्या काळात आपण पाहतो की केवळ स्वत:च्या करीअर पुरतीच धावपळ, उठाठेव सुरु असते. लतादिदींनी मात्र कुटुंबीयांसह इतरांना सुद्धा लता असूनही वटवृक्षाप्रमाणे आधार दिला व वाटचाल करीत राहिल्या. 30 हजार पेक्षाही जास्त गाणी गायली , आनंदघन नावाने संगीत सुद्धा दिले. त्यांच्या गायनाबद्दल व अवीट गोड अशा गाण्यांबद्दल लिहू गेल्यास सब धरती कागज करू , लेखनी सब वनराय , सात समुद्र की मसी करू या कबीरांच्या गुरुसाठी लिहिलेल्या दोह्याप्रमाणे समस्त धरतीचा कागद, सात समुद्राची शाई, व सर्व वनांतील झाडांची लेखणी करून लता दीदींबाबत लिहू गेलो तरी ते लिहिता येणे अशक्य आहे. तसेच लता दीदी यांच्या निधनानंतर काही बोलणे, लिहिणे हे अशक्यच झाले. म्हणूनवं सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सुद्धा “लता मंगेशकर यांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनाला ज्या वेदना झाल्या व जी पोकळी निर्माण झाली त्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे” असे समर्पक विधान केले. लता दीदी यांच्या अंतिम संस्काराचे वृत्त पाहत असतांना मन सुन्न झाले होते. अनेकांचे लेख येऊ लागले होते परंतू मी मात्र स्तब्धच, निशब्द झालो होतो. एका मित्राचा फोन सुद्धा आला की, “इतके लिहीतो लता दीदींबद्दल काहीच नाही लिहिले रे” , “लिहील रे” मी उत्तरलो. अनेक विचार मनात घोळत होते. किती एकापेक्षा एक सरस अशी गाणी, काय तो उंच चढणारा, गोडव्यात मधालाही मागे टाकणारा आवाज. आकाशवाणीवर सकाळी ऐकलेले लता दीदींनी गायलेले अभंग, देशभक्तीपर गीते व नतंर हजारो जुनी फिल्मी गाणी ऐकत-ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलेच आम्ही. असंख्य गाण्यातील कोणत्या गाण्यांबद्दल लिहावे? “ये मुलाकात एक बहाना है” खानदान चित्रपटातील हे गीत कितीही पुनरावर्तने होवोत कंटाळा तो मुळी येतच नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या लता दिदींनी “मै हुं अपने सनम की बाहो मे, मेरे कदमो तले जमाना है” हा आपल्या सोबत्या सोबत असलेला भाव शब्दांत किती सुंदर व्यक्त केला आहे. तेच “आजकल पांव जमी पर नही पडते मेरे” बाबत, अभिनेत्री साधनावर चित्रित झालेले “तेरा मेरा प्यार अमर” किती गोड, पहायलाही व ऐकायलाही सुंदर. हजारो गाणी आहेत. “दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या कीजे?”, रेखा वर चित्रित “कैसी लग रही हुं मै?” ही सर्व गाणी हा लेख लिहितांना कानात घुमत आहेत. आयेगा आयेगा आनेवाला, पंछी बनू उडती फिरू अशा जुन्या गीतांपासून ते अगदी आजच्या “कितने अजीब रिश्ते है यंहा पे“, “मेरे ख्वाबो मे जो आये”, “मधुबन मे जो कन्हैय्या” ही गीते तसेच मैने प्यार किया, पत्थर के फुल, सनम बेवफा या चित्रपटातील गीते. अशा गीतांबाबत लिहू गेल्यास उपरोक्त दोह्याप्रमाणेच गत होईल. म्हणूनच काय लिहावे कळत नव्हते, शब्दांची कृपा होत नव्हती, लिहिण्यास उशीर झाला खरा परंतू लिहवित्याने आजचा हा लेख स्फुरण्याचे निमित्त घडवलेच. हे निमित्त म्हणजे खामगांवच्या पशूंच्या दवाखान्याजवळ रस्त्याच्या कडेला मला दिसलेले एक श्रद्धांजलीचे बॅनर. आत्मशक्ती ब्रास बँड पार्टीने लावलेले हे बॅनर पाहून मला आश्चर्य व आदर दोन्ही वाटले. मी या लेखासह दिलेला त्या बॅनरचा त्वरीत फोटो काढला. आपण ज्या प्रतिथयश गायिकेनी गायलेली गाणी आपल्या बँडवर वाजवली त्यामुळे आपला चरितार्थ चालला त्या गायिकेप्रती आदराची, कृतज्ञतेची भावना प्रकट करणारे ते त्या बँड पार्टी वाल्यांनी लावलेले ते बॅनर म्हणजे आपल्या देशाची एकात्मता, समाजिक समरसता प्रकट करणारे वाटले. या बँड पार्टीने लता दीदींना श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुद्धा परवा सकाळी घेतला होता. बँड पार्टीचे संचालक मोतीराम बोरकर यांना तेथील बोर्डवरचा नंबर पाहून फोन केला, त्यांच्याशी बोललो त्यांना बरे वाटले, “साहेब या माउलीने म्हटलेली गाणी आम्ही वाजवतो, आमचे घर चालते. आमचा बी बँडचा मंजे संगीताचा धंदा हाय, लता माऊलीने बी लगन न करता संगीताशीच लगन केलतं, मंग या माऊलीसाठी एक बॅनर बी नायी लावू शकत काय?“ लता मंगेशकर यातील लता या नांवास उलट लिहिल्यास ताल शब्द निर्माण होतो, अशा नावातच ताल असणा-या legendary गायिकेस पंतप्रधानांपासून ते खामगांवच्या आत्मशक्ती बँड पार्टीने वाहिलेली श्रद्धांजली ही त्या जनसामान्यांच्या मनातल्या ख-या “भारतरत्न” होत्या याचे द्योतक आहे.