प्यार को प्यार ही रहने दो....
व्हॅलेंटाईन डे बाबत अनभिज्ञता होती. शिवाय 1960 च्या दशकातील "जो दिलमें है ओठोपे लाना भी मुश्कील" ते 90 च्या दशकातील "छुपाना भी नाही आता जताना भी नही आता" अशी हिंदी गीते सुद्धा प्रेमाची एक उदात्त अशी भावना तरुणांना शिकवत होते. आताच्या पिढीचे प्रेम म्हणजे आज प्रेम आणि उद्या ब्रेक अप असे प्रेम पुर्वी नव्हते.
हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू
हात से छू के इन्हे रिश्तोका इल्जाम ना दो |
व्हॅलेंटाईन डे समीप आला, प्रेमाची कबुली करण्याचा, प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेल्या तरुणाईच्या या दिवसाने पश्चिमी देशातून आपल्या देशात हळूच शिरकाव केला. शिरकाव होऊनही बरीच वर्षे झाली. आम्ही हायस्कूल मध्ये असतांना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर एक छोटीसी जाहिरात येत असे. त्यात व्हॅलेंटाईन डे बाबत काहीबाही लिहिलेले असे, असे मला पुसटसे स्मरते. मग दुस-या दिवशी शाळेत काय असते बे हे व्हॅलेंटाईन डे ? असा प्रश्न कुणी विचारत असे. त्यावर "अबे शहरात असते ते काही तरी कॉलेजातल्या पोरा पोरींचा प्रेमाचा दिवस असते बुवा" असे म्हणत दुसरा आपले ज्ञान पाजळत असे. त्या काळात अनेकांच्या घरी वृत्तपत्रे येत आणि मुले सुद्धा पेपर वाचत असत. आता मात्र लहान वयातच मुलांना बरेच वाजवी व अवाजवी ज्ञान प्राप्त झालेले असते. व्हॅलेंटाईन डे हा दिवस म्हणजे नक्की असतो तरी काय? हे समजण्यासाठी आम्हाला पार हायस्कुलपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत यावे लागले होते. आमच्या या अज्ञानामुळे आमचे नुकसान झाले की फायदा हे निश्चित सांगता येणार नाही. पण आताच्या पिढी प्रमाणे मात्र तेंव्हा आणि आमच्याही आधीच्या पिढ्यांना प्रेम व्यक्त करणे काही जमत नव्हते आणि या दिवसाबाबत अनभिज्ञता पण होती. शिवाय 1960 च्या दशकातील "जो दिलमें है ओठोपे लाना भी मुश्कील" ते 90 च्या दशकातील "छुपाना भी नाही आता जताना भी नही आता" अशी हिंदी गीते सुद्धा प्रेमाची एक उदात्त अशी भावना तरुणांना शिकवत होते. प्रेम व्यक्तच नाही झाले किंवा व्यक्त करता नाही आले तर "वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा" अशीही शिकवण देणारी गीते होतीच. आताच्या पिढीचे प्रेम म्हणजे आज प्रेम आणि उद्या ब्रेक अप असे प्रेम पुर्वी नव्हते. प्रेमाचा अव्हेर केला म्हणून कुणाला जीवेच मारून टाकणे असेही नव्हते किंवा पतीला मारून मग त्याचा मृतदेह ड्रम मध्ये टाकून त्यात सिमेंट भरून टाकणे असेही नव्हते. जगाला प्रेमाची शिकवण देणा-या भारतात आता मात्र प्रेम, प्रेमाची व्याख्या सर्वच बदलून गेले आहे. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडीत होय" असे सांगणा-या संत कबीरांपासून अनेक संत मंडळी ते कवी गीतकारांनी त्यांच्या त्यांच्या शब्द सामर्थ्याने आपल्याला प्रेम काय असते याची शिकवण दिली आहे.
परवा येणा-या व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने अशीच गीते , दोहे, भारताने जगाला दिलेले अनेक उदात्त प्रेमाचे दाखले हे विचार लेखासाठी म्हणून मनात येत होते, त्यातच आठवण झाली ती स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या, हेमंतकुमार या धीर गंभीर आवाजाच्या गायकाने स्वरबद्ध केलेल्या आणि कवी कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या संपूर्णसिंह कालरा यांनी लिहिलेल्या नितांत सुंदर अशा प्रेमगीताची. संपूर्णसिंह कालरा म्हणजे आपले गुलजार बर का !
1969 या वर्षी झळकलेल्या खामोशी या चित्रपटात एक नितांत सुंदर, श्रवणीय, हृदयस्पर्शी असे गीत आहे. लेखाच्या शीर्षकात आणि सुरुवातीला याच गीताच्या ओळींचा उपयोग केला आहे. हे गीत म्हणजे
हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू
हातसे छू के इसे रिश्तो का इल्जाम न दो,
एक अहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो |
अध्यात्मिक टच असलेल्या या गीतात कवी सुरुवातीलाच म्हणतो की आंखो की खुशबू .... आता डोळ्यातून खुशबू या कवी कल्पनेतच आपणास गुलजारची प्रतिभा दिसते. डोळ्यातून प्रेम स्पष्टपणे दिसते याच अर्थाने कवीने आंखो की खुशबू असे म्हटले आहे. या अशा डोळ्यातून व्यक्त होणा-या निस्सीम, निस्वार्थ प्रेमाला स्पर्श किंवा कोणत्याही नात्यात अडकवू नये असे कवी म्हणतो. प्रेम म्हणजे फक्त एक जाणीव आहे, अहसास आहे त्याला रूह अर्थात आत्म्यापासून आपण जाणले पाहिजे, समजले पाहिजे. आणि प्रेमाला कोणतेही नांव न द्यावे (आजच्या भाषेत BF, GF) असेही कवी सांगतो.
याच गीतात पुढील दोन कडव्यात कवी यावर प्रकाश टाकतो की, खऱ्या आत्मिक प्रेमात आवाज नसतो, काही बोलणे नसते तर एक शांतता, अव्यक्तता, एक खामोशी असते ही अव्यक्तताच सर्व काही सांगून जात असते, ऐकत असते. ही अव्यक्तता म्हणजे जणू काही युगानुयुगांपासून, परमात्म्या पासून आलेला नूर की बुंद अर्थात दिव्य प्रकाशाचा एक थेंबच आहे जो कधीच थांबलेला नाही, डोळ्यांवर एक विशिष्ट चमक येते, डोळ्यात हास्याची लकेर उठते. ओठ बंदच असतात, व्यक्त होऊ शकत नाही परंतू थरथरणा-या ओठांत मात्र कितीतरी अव्यक्त अशा भावना, कथा थांबून राहिलेल्या असतात.
प्रेमाला हाथ से छू के इसे रिश्तो का इल्जाम ना दो अर्थात प्रेमाला स्पर्शरहीत, पवित्र कोणत्याही नात्यात न अडकवणारी अशी उपमा गुलजार यांनी दिली आहे. आजची भौतिक सुखाकडे आकृष्ट होणारी, महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या म्हणजेच प्रेम आहे असे समजणा-या या पिढीला गुलजार यांनी वरील गीतात प्रकट केलेले हे प्रेम कितपत पचनी पडेल देव जाणे ?
गीत👇
हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो हम ने देखी है ... प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं एक खामोशी है सुनती है कहा करती है ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं नूर की बूँद है सदियों से बहा करती है सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो हम ने देखी है ... मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कहीं और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर कितने खामोश से अफ़साने रुके रहते हैं सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो हम ने देखी है ..

✅🙏🙏🙏🙏🌹 सुंदर
उत्तर द्याहटवा