Click "Follow" Button below To Follow this Blog

१७/०९/२०२६

Artical written for marathi weekly Vivek on the occasion of Ganpati Festival 2026

लाकडामंदी कोरलाय भक्तीभाव.

खामगांवच्या लाकडी गणपती बद्दल विविध जाती धर्माच्या सर्व खामगांवकरांना प्रचंड आत्मीयता आहे. खामगांवातील गरीब, श्रीमंत सर्वांचा लाकडी गणपती आधार आहे. त्याच्या मंदिरात सर्वजण रमतात.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहर म्हणजे कापसासाठी प्रसिद्ध असे शहर, कापसाची मोठी बाजारपेठ येथे होती. देशभरातील कापसाचा भाव खामगांवातून ठरायचा असे जुने जाणकार लोक सांगत असतात, सिल्वरसिटी ही तशी  खामगांवची अलीकडची प्रसिद्धी. पण ज्याप्रमाणे येथे चांदीच्या कलात्मक वस्तू बनतात त्याचप्रमाणे येथे उत्कृष्ट शिल्पकलेचे सुद्धा दर्शन घडते. येथील नटराज गार्डन आणि जनुना तलाव  उद्यानातील आकर्षक शिल्पे, राष्ट्रीय शाळेतील लक्षवेधक शिल्पे याची साक्ष देतात. अशा कलेची जोपासना करणाऱ्या गावातील ग्रामदैवत लाकडी गणपती सुद्धा काष्ठशिल्पाचा जबरदस्त नमुना आहे. हा मानाचा लाकडी गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. साधारणत: एकशे तीस वर्षांपूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तेंव्हापासून आजपर्यंत येथील गणेशोत्सव व वर्षभरातील कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्राच्या विविध भागातील भाविकांसोबत मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड येथील भाविकही या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. अतिशय रेखीव व तेवढीच देखणी असलेली ही गणेश मूर्ती  लाकडातून साकारण्यात आली आहे.  सहा फूट उंच ही गणेश मूर्ती काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. लाकडी गणपतीचे मुकुट त्याचे कान, सोंडेवरील नक्षीकाम आणि मूषकराज हे  चांदीने मढवण्यात आले आहे. त्यामुळे मुर्तीच्या देखणेपणात आणखी भर पडली आहे. संपूर्ण लाकडापासून तयार केलेली अशी गणेशाची मूर्ती महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात क्वचितच आढळेल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दुरूनच या गणेशाचे दर्शन घडते. पाहता क्षणीच ही मूर्ती मनात घर करते. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय आनंदी आणि मनाला शांती देणारे आहे गणेशोत्सव काळात मूर्तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असतात अशीही काही भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती कसा तयार झाला याच्या दोन आख्यायिका सांगितल्या जातात. 

     काहींच्या मते एकशे तीस वर्षांपूर्वी खामगांव शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला (आताच्या फरशी नाल्याला ) मोठा पूर आला होता. त्या पुरात लाकडाचा एक मोठा ओंडका वाहत आला. तो फरशी जवळ अडकला. तेंव्हा गावकऱ्यांना तो ओंडका गणपतीच्या आकाराचा असल्याचा जाणवला. तो पाण्यातून बाहेर काढला असता हुबेहूब गणपतीच असल्याचे आढळल्याने गावकऱ्यांनी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. 

     दुसऱ्या आख्यायिकेनुसार खामगांवातील फरशी भागातील अय्याची कोठी भागात दक्षिणेकडून आलेले आचारी राहत होते. त्याकाळी गॅस आदी उपकरणे नसल्याने स्वयंपाक हा चुलीवर होत असे त्यामुळे हे आचारी लोक मोठमोठी लाकडे आणत असत, त्यातील काही लाकडांमध्ये त्यांना गणपतीचे अवयव भासले व तशा लाकडांपासून त्यांनी हा सुरेख गणपती तयार करून घेतला आणि अय्याची कोठी भागातच त्याची प्रतिष्ठापना केली. 

     नंतरच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत त्याला मानाचे स्थान देण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत लाकडी गणपती पहिल्या क्रमांकावर असतो पण त्याचे विसर्जन केले जात नाही त्या दिवशी केवळ हलविला जातो. ठरलेल्या मार्गावरून शोभायात्रा फिरल्यानंतर हा गणपती परत मंदिरात आणण्यात येतो. खामगांवातील गणेशोत्सव अतिशय शांततेत कसा पार पडेल आणि अन्य गणेश मंडळांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत लाकडी गणपती निर्धारित वेळेतच फरशीवर आणण्यात येतो सर्व गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे नेतृत्व याच गणपतीकडे असल्याने ते निर्विघ्न आणि वेळेत पार पडण्याची काळजी लाकडी गणेश मंडळ घेते. एरवी मिरवणुकीत जल्लोष असतो "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" असा जयघोष होतो, उत्सवाचा अतिरेक मात्र केला जात नाही. शिस्तीत, जल्लोष आणि शांततेत उत्सव साजरा करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळते. या गणपतीची विसर्जनाची प्रतीकात्मक मिरवणूक ही पुर्वी बैलगाडीत निघत असे आता मात्र काही अंतरापर्यंत गाडी बैल ओढतात व नंतर मात्र सुशोभित ट्रॅक्टर मधून गणपतीला नेले जाते. 

लाकडी गणपती मिरवणुकीचा जुना फोटो

     लाकडी गणपती बाबत एक कटू व विसरली जाणार नाही अशी आठवण सुद्धा आहे जी इथे सांगितल्या वाचून राहवत नाही. ती आठवण म्हणजे, 1956 मधील दंग्यात गणपतीस इजा पोहचली होती. त्या काळात झालेला हा भीषण दंगा होता. ज्याचे वृत्त BBC रेडिओ ने दिले होते. अल्पावधीतच लाकडी गणपतीस जिथे क्षती पोहचली होती तो भाग पुनर्निर्मित केला गेला. असे जुन्या पिढीतील जाणकार लोकांकडून ऐकले आहे. 

      स्वातंत्र्यानंतर खामगांवकरांनी या गणपतीकडे विशेष लक्ष दिले. त्यावेळी खामगांवातील व्यापारी मंडळी विशेषतः अडत व्यापाऱ्यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला. त्यावेळच्या विश्वस्त मंडळात जयनारायण नंदलाल, माताशरण दुबे, दत्तात्रय उर्फ वैद्य नानासाहेब वरणगांवकर, एकनाथ जयराम,  गंगाधरराव पिवळटकर, भिकाजी निंबाजी आणि त्र्यंबकलाल पूरवार यांनी काम पाहिले.  1995 मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी आर. बी. अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना या मंदिराचे व्यवस्थापन सोपवले. सध्या या लाकडी गणपती मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरज अग्रवाल हे असून शेखर पुरोहित, अधिवक्ता धनंजय भेरडे, अमित गोयनका, संजय झुनझुनवाला असे पदाधिकारी व इतर सदस्य निष्ठेने कार्य करीत आहे.

 सुरुवातीला छोट्या जागेत असलेल्या या मंदिराचा 1997 या वर्षी पहिला जिर्णोद्धार करण्यात आला. पण तरीही वाढती लोकसंख्या आणि मंदिराचा वाढता कारभार पाहून ही जागा सुद्धा कमी पडत होती म्हणून गतवर्षी म्हणजे 20/08/2025 रोजी मंदिराचा पुन्हा विस्तार करण्यात आला यासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या जागा काही मंडळींनी दान केल्या त्यात गिरजापुरे कुटुंबीयांचा यांचा मोठा वाटा आहे. आता मंदिर हे अधिक प्रशस्त व नजरेत भरेल असे झाले आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त भाविकांना सामावून घेणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. 

लाकडी गणपती मंदिराच्या आधुनिक स्वरूप

     मंदिर परिसर चिंचोळा असला तरी भाविकांना कमीत कमी त्रास होतो दर्शनाच्या वेळी शिस्त पाळली जाते. रांगेतील भाविक अन्य भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस भाविकांची गर्दी असते. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला सुद्धा मोठी गर्दी असते.    खामगांवकरांचे आराध्य दैवत असलेल्या लाकडी गणपतीशी भाविकांच्या भावना जुळल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सव काळात बाहेरगांवी नोकरी व्यवसाय निमित्त गेलेले नागरिक लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.

लाकडी गणपती खामगांवाचा सामाजिक सहभाग :-

१. अन्नदान -

लाकडी गणपती मंदिर संस्थान खामगावात अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमात सामाजिक उपक्रम राबवत आले आहे. 1980-90 च्या दशकात भाविकांना प्रसाद वितरण तसेच अन्नकुटाचे आयोजन करण्यात येत असे चतुर्थीच्या दिवशीचा प्रसाद हा काही भक्त स्वतःच्या घरी बनवून भाविकांना वितरित करत असत. गणेशोत्सवात जनतेसाठी अन्नकुटाचे आयोजन सुद्धा अनेक वेळा झाले आहे. 

२. पर्यावरण जन जागृती

लाकडी गणपती संस्थानचा गणेशोत्सव अधिकाधिक निसर्गप्रेमी व स्मरणात राहणारा असावा म्हणून या मंडळाचे काम सुरू असते. एरवी  गणेशोत्सव म्हटला की दरवर्षी पीओपी, ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण असे विषय चर्चेत येतात परंतु खामगांवच्या या मानाच्या लाकडी गणपती मंडळाने मिरवणुकीत साधेपणाचा अंगीकार करून ध्वनी प्रदूषणास आळा घालण्यास हातभार लावला आहे. संस्थान पर्यावरण रक्षणाचे कार्य अनेक सुद्धा अनेक वर्षापासून करत आले आहे. कोणत्याही  प्रकारच्या प्रदूषणाला मोठा हातभार लागणार नाही यासाठी व्यवस्थापन काळजी घेते. शहरातील इको फ्रेंडली गणेश उत्सवालाही प्रोत्साहन देते. 

३. आरोग्य शिबिरे-

   याशिवाय या लाकडी गणेश मंदिराचे विश्वस्त विविध सामाजिक कार्याला हातभार लावतात. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याबरोबरच आरोग्य सेवेसाठी मंदिर व्यवस्थापन शिबिरांचे आयोजन करत असते. खऱ्या गरजूंना उपचारासाठी मदतही दिली जाते. 

४. रक्तदान शिबिरे-

   दरवर्षी गणेश जयंतीच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केले जाते गतवर्षी यात 117 युवकांनी रक्तदान केले होते. विशेष म्हणजे रक्तदात्यांचा सन्मान सुद्धा विश्वस्त मंडळ करत असते.

 ५. संस्कृती जतन-

आपली भारतीय संस्कृती परंपरा जतन व्हावी म्हणून तसेच संस्कृत लोक नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना यावे म्हणून धार्मिक पुस्तकांची व श्लोकांची पुस्तके किशोरवयीन विद्यार्थ्यांना व तरुणांना मोफत वितरित केली जातात. आज पर्यंत शेकडो अथर्वशीर्ष पुस्तकाचे वितरण या गणपती संस्थांनी केले आहे.

 आगामी काळात भाविकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासोबतच येणाऱ्या मिळकतीतून मोठे सामाजिक कार्य उभे करण्याचा मानस येथील व्यवस्थापन मंडळाने केला आहे.

खामगांवच्या लाकडी गणपती बद्दल विविध जाती धर्माच्या सर्व खामगांवकरांना प्रचंड आत्मीयता आहे. खामगांवातील गरीब श्रीमंत सर्वांचा लाकडी गणपती आधार आहे. त्याच्या मंदिरात सर्वजण रमतात म्हणून शेवटी असे म्हणावेसे वाटते की,

लाकडामंदि कोरलाय भक्ती भाव 

रमती इथे रंका संगती राव. 

- समाप्त -

👉 हाच लेख ७ सप्टे  २०२६ च्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रकाशित झाला आहे. साप्ताहिक विवेकची  लिंक👇 https://www.evivek.com/Encyc/2026/9/9/article-on-lakdi-ganpati-temple-khamgaon.html

✍️ विनय वि. वरणगांवकर© 

9403256736

खामगांव

०३/०९/२०२६

Article about a lady who ran for her daughter

..आणि रमाबाई धावल्या 


आपल्या लेकरांसाठी घेतलेले कष्ट, झेललेली अनेक संकटे याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत परंतु रमाबाई रणवरे यांनी एक माता आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे  आपल्याला प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.  

काल रमाबाई रणवरे नावाच्या एका स्त्रीचे प्रेरणादायी असे वृत्त वाचले आणि डोळ्यासमोर काही उल्लेखनीय अशा रमाबाई नावाच्या स्त्रिया  येऊन उभ्या राहिल्या. का नाही उभ्या राहणार ? रमा हे नावच तसे आहे, लक्ष्मीचे. खरे तर रमाबाई नावाच्या अनेक कर्तृत्ववान नावाच्या स्त्रिया असतील आणि होऊनही गेल्या असतील पण माझ्या डोळ्यासमोर मात्र तीन रमाबाई आल्या. त्यात सर्वप्रथम माधवराव पेशव्यांच्या सहचरणी, माधवरावांच्या आजारपणात त्यांची सुश्रुषा करणाऱ्या, त्यांच्या मरणोपरांत सती जाणाऱ्या, थेऊर गणपती येथे चित्त लावणाऱ्या आणि तिथेच त्यांची समाधी असणाऱ्या रमाबाई पेशवे या आठवल्या. नंतर आठवल्या थोर समाजसेविका, हिंदू लेडी सोशल क्लब आणि सेवासदन सोसायटीची स्थापना करणाऱ्या, पतीच्या प्रेरणेने स्वतः शिक्षण घेऊन 1886 मध्ये मुलींसाठी पहिले उच्च विद्यालय स्थापन करणाऱ्या रमाबाई रानडे. त्याचप्रमाणे आणखी एक अशा रमाबाई डोळ्यासमोर आल्या की ज्यांच्याबाबत, "त्यांच्या आत्मत्यागामुळे माझे विदेशातील शिक्षण पुर्ण झाले." असे   डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्या त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर. अशा मुख्यत्वे करून तीन रमाबाई माझ्या डोळ्यासमोर आल्या त्याला निमित्त घडले ते वर उल्लेखलेले मी वाचलेले रमाबाई रणवरे यांचे प्रेरणादायी वृत्त.  

     रमाबाई रणवरे अंबाजोगाई, जि. बीड येथील अतिशय सर्वसामान्य स्थितीत जीवन जगणारी , लोकांच्या घरी स्वयंपाक करून आपल्या दोन मुलींचा सांभाळ करणारी , पतीचे निधन झालेले अशी 47 वर्षाची स्त्री. दुसऱ्यांच्या घरी काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भारतातील कुटुंबीयांच्या परिस्थितीबद्दल जास्त विशद करण्याची काही आवश्यकता नाही आपण सर्वच असे कुटुंबीय, असे लोक जवळून पाहत असतो. त्याच प्रकारात मोडणाऱ्या या रमाबाई रणवरे. पतीचे अपघाती निधन झाल्यावर दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी रमाबाई कंबर कसून कष्ट करू लागल्या. बरेच प्रसंगी सरकारच्या अनेक फुकटछाप प्रकारच्या योजनांमुळे समाजात असे बोलले जाते की आता गरीब कोणी राहिले नाही. परंतु वास्तविक पाहता अनेक योजना घरी आल्या असल्या तरी कित्येकांना त्या योजनांचा लाभ घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती ही बिकटच असते. काही प्रसंगी लाभ घेऊनही परिस्थिती ही बेताचीच राहते. अशाच एका गरीब कुटुंबातील या रमाबाई रणवरे. परिस्थिती कशीही का असो ना मुलींचे शिक्षण मात्र करायचेच असा दृढनिश्चय त्यांनी केला. अशातच त्यांच्या वाचनात एक जाहिरात आली ही जाहिरात होती अमृत दौडची अर्थात अंबाजोगाई येथील एका मॅरेथॉन स्पर्धेची. आयोजकांनी प्रथम विजेत्यास तीन हजार रुपये बक्षीस ठेवले होते. रमाबाईंनी त्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. त्यांच्या मोठ्या मुलीने सुद्धा त्यांच्यासोबत त्या स्पर्धेत भाग घेतला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक तयारीनिशी आले होते. धावण्यासाठी लागणारे कपडे चांगले बूट आदी परिधान करून आले होते. रमाबाई मात्र साध्या साडीमध्ये धावायला लागल्या. त्यांच्या पायात चप्पल होती. थोड्या वेळाने त्यांना चपलीचा अडसर वाटला तर त्यांनी चप्पल सुद्धा काढून टाकली आणि त्या पळायला लागल्या, आपल्या लेकींच्या शिक्षणासाठी त्यांनी वेग पकडला आणि बघता-बघता सर्व धावपटूंना मागे टाकून त्यांनी शर्यतीची अंतिम रेषा पार पाडली आणि प्रथम क्रमांक पटकावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लेकींच्या शिक्षणासाठी रमाबाई धावल्या त्यातील मोठी लेक ही याच शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिली. आईने आपल्या लेकरांसाठी घेतलेले कष्ट, झेललेली अनेक संकटे याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत. परंतु रमाबाई रणवरे यांनी एक माता आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे  आपल्याला प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.  मित्रांनो रमाबाई रणवरे यांची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.  कदाचित एखाद्याला स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम तीन हजार ही अल्प अशी रक्कम वाटेल परंतु रमाबाईंसाठी आणि त्यांच्या लेकींसाठी मात्र हे तीन हजार रुपये म्हणजे एक मोठी रक्कम आहे. 

आपल्या भारतात आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की ज्यात छोट्या-छोट्या रकमांच्या घेण्या-देण्यावरून वाद होऊन खून पडले आहे. छोट्या-छोट्या रकमांच्या चोऱ्या सुद्धा झाल्या आहेत. छोट्या रकमांचा भ्रष्टाचार किंवा अपहार सुद्धा झाला आहे. परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि लेकींच्या शिक्षणासाठी धन मिळावे म्हणून बक्षिसाची रक्कम छोटी का असेना म्हणून रमाबाई रणवरे या मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या आणि केवळ धावल्याच नाही तर प्रथम क्रमांक सुद्धा पटकावला. शासनाकडून मोफत पैशांची आशा बाळगणाऱ्या त्या मोफत पैशांसाठी प्रसंगी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या अशा तमाम बंधू आणि भगिनींनी,  अनुदाने  लाटणाऱ्यांनी रमाबाई रणवरे यांचा आदर्श घ्यावा.

"कार्येषु दासी, करणेषु मन्त्री, रूपे च लक्ष्मी, क्षमया धरित्री।"
अर्थात स्त्री ही कामात तत्पर, निर्णयात सल्लागार (मंत्री), रूपात लक्ष्मी आणि सहनशीलतेत पृथ्वीसारखी असते. आधुनिक संदर्भात तिची हीच अष्टपैलू क्षमता तिच्या धडाडीचे रूप घेते.
वरील सुभाषित रमाबाई रणवरे यांच्यासाठी अगदी समर्पक ठरते. रमाबाई रणवरे यांच्या या धडाडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ता. क. - हिंदू संस्कृतीमधील हे स्त्रियांबाबतचे सुभाषित कुणाचा संपर्क असल्यास त्यांनी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवावे ही विनंती. 

०६/०८/२०२६

Article about Shalarth software of School

 कोणाची म्हैस अन कोणाला उठ - बैस 


अनेक ठिकाणी व अनेक वेळा शासनाच्या, कंपनीच्या अशा सदोष पद्धतीमुळे ज्यांचा काहीही दोष नसतो त्या कर्मचाऱ्यांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागतात. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस.

कोणाची म्हैस अन कोणाला उठ - बैस. या म्हणीचा प्रत्यय अनेकदा येत असतो. काम किंवा चुका  कुण्या इतरांच्या असतात आणि हेलपाटे मात्र दुसऱ्यांना घ्यावे लागतात असा या म्हणीचा आशय आहे. शासकीय कामात तर नेहमीच याचा प्रत्यय येत राहतो. अनेकदा काही लोकांकडून चुका होतात किंवा शासकीय यंत्रणेत त्रुटी असतात आणि त्या त्रुटींमुळे त्रास मात्र नागरिकांना होत असतो. असेच खाजगी क्षेत्रात सुद्धा आहे. बरेच वेळा कंपन्यांनी विकलेल्या गाड्या त्या गाड्यांमधील असलेल्या दोषांमुळे ग्राहकांकडून परत मागून घेतल्या गेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतील त्रुटींमुळे अनेक अर्ज सरकारने नंतर बाद केले. या योजनेतील त्रुटींमुळे असेही आढळून आले की काही अर्ज हे पुरुषांनी केले होते. असे कित्येक दाखले देता येतील. 

     असेच एक प्रकरण शिक्षण विभागात घडले. शिक्षण विभागात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे ऑनलाईन वितरित करण्यासाठी सुमारे बारा/तेरा वर्षांपूर्वी शालार्थ ही प्रणाली लागू करण्यात आली.  पगार बिले सादर करतांना सुद्धा शालार्थ मधूनच सादर करावी लागतात. शिवाय अजूनही ऑफलाइन पद्धत ही सुरूच असल्यामुळे सर्व लिपिकांना महिन्यातून एकदा शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने बिले सादर करण्यासाठी बिले घेऊन जावेच लागते. ऑनलाइन झाल्यामुळे अनेक कार्य ही सोपी झाली हे सर्वांसाठी नक्कीच फायदेशीर आहे पण शालार्थ प्रणाली ही शासनाने ज्या कंपनीकडून विकसित करून घेतली त्या कंपनीकडून ही प्रणाली विकसित करतांना त्यात एक त्रुटी राहून गेली. याच त्रुटीचा फायदा काही अवैध कार्य करणाऱ्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेतला. शासकीय पैसा लाटणाऱ्या अशा व्यक्ती व संस्थांनी शालार्थ  प्रणालीतील ही त्रुटी ओळखून त्यामध्ये बोगस शिक्षक शिक्षकेतर आयडी वापरून करोडो रुपयांची बिले काढली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर शासनाला जाग आली आणि ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये काहीही दोष नव्हता त्यांच्याकडून बँक केवायसी,  पॅन कार्ड,  आधार कार्ड,  चेक बुक ची झेरॉक्स अशा प्रकारच्या कागदपत्रांची वारंवार मागणी केली जात आहे याचा अर्थ जे दोषी आहेत त्यांना तर शासन जी काही शिक्षा करेल ती करेलच परंतु जे कर्मचारी इमाने इतबारे काम करत आहेत त्यांच्या कार्यात ही कागदपत्र गोळा करून सादर करण्याची आणखी एक वाढ झालेली आहे. शिवाय शालार्थ प्रणालीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला सदोष असलेली प्रणाली शासनाला विकल्याबद्दल त्या कंपनीवर काय कारवाई केली ? किंवा त्यांना त्या कंपनीला कोणता दंड आकारण्यात आला ? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. खरे म्हटले तर या शालार्थ प्रणालीमध्ये बोगस आयडी कोणालाही करताच आला नाही पाहिजे अशी तरतूद सुरुवातीपासूनच असायला हवी होती परंतु ती कंपनीने दिली नाही म्हणून कंपनी यात दोषी आहे. शालार्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीने  एक प्रकारे शासनाची दिशाभूल करून फसवणूकच केलेली आहे कारण त्यांनी शासनाला सदोष प्रणाली विकली आहे. शालार्थच्या या सदोष प्रणालीमुळे आणि शिक्षण विभागामुळे निर्दोष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागत आहे.  शासनाने व शिक्षण विभागाने यावर उपाययोजना करून ज्या शिक्षक शिक्षकेतर करणाऱ्याचा काहीही दोष नाही त्यांना विनाकारण कागदपत्रे आदीच्या मागे लावू नये शिवाय त्यांना कागदपत्रे सादर न केल्यास वेतन होणार नाही असे सुद्धा म्हणू नये. अनेक ठिकाणी व अनेक वेळा शासनाच्या, कंपनीच्या अशा सदोष पद्धतीमुळे ज्यांचा काहीही दोष नसतो त्या कर्मचाऱ्यांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागतात. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस.

 

३०/०७/२०२६

Article on abusing and vulgarllity in jantar mantar protest

 ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर 

जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात  तरुण तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात अनेक महान तरुण होऊन गेले.

लहानपणी अभ्यास न करता जी मुले निव्वळ खेळायला, हुंदडायला जाणाऱ्या मुलांना  वडील मंडळी शीर्षकात जी हिंदी भाषेतील म्हण दिली आहे ती ऐकवत असत. बरेच राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचे वॉलेंटियर बनावे म्हणून आवाहन करीत असतात. नुकत्याच नव्याने जन्म घेतलेल्या आणि अजब नांव धारण केलेल्या झुरळ पार्टीने सुद्धा तसे आवाहन त्यांच्या वेबसाईटवरून केलेले आहे. त्याच पार्टीने नीट पेपरफूट प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले आणि त्यासाठी लाखो Gen Z तरुण रस्त्यावर उतरले होते. आंदोलना दरम्यान या तरुणांनी मांडलेला उच्छाद अवघ्या जगाने पाहिला. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचलित झाले  तरुण-तरुणींच्या तोंडातून देशाच्या पंतप्रधानांना दिलेल्या शिव्यांची लाखोली ऐकून भारतातील सुज्ञ, विचारी, संस्कारी जनांना वाईट वाटले, वेदना झाल्या. शिव्याच नव्हे तर अश्लील हावभाव सुद्धा Gen  Z पिढीतील काही तरुण करत होते. एका महिला पत्रकाराचा विनयभंग सुद्धा या दरम्यान झाला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे काही गैर नाही. सरकार जर का काही चुकीचे करत असेल तर आंदोलन होणारच पेपरफुटीचे प्रकरण झाल्यावर cjp ने आंदोलन पुकारले परंतु नीट पेपरफुटीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर सरकारने कारवाई केलेली होती.  काहींना अटक सुद्धा झाली होती. तरीही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा तगादा सीजेपीने लावला व अखेर त्यांनी तो दिला. त्यांच्या  आंदोलनात काही समाजकंटक सहभागी झाले आणि त्यांनी शिव्या, अश्लील हावभाव, तोडफोड, पोलिसांवर हल्ले, सार्वजनिक संपत्तीची नासधूस अशी कृत्ये केली पण असे करणारे तरुण हे सीजेपीचे नव्हते असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. पण ते कोण होते हे आता हळूहळू पुढे येत आहेच. काही तरुणांची मजल तर भारतीय सेना, पोलीस यांच्याविरुद्ध अपशब्द काढण्यापर्यंत त्यांना धक्काबुक्की करणे व मारण्यापर्यंत गेली. कोण होते हे तरुण ? यांची एवढी हिंमत कशी काय होते ? यांना मदत करणारे कोण होते ? यांच्या मागे आतंकवादी , देशविघातक लोकं होते का ? याचा सर्व शोध तपास यंत्रणा आता घेतीलच. मोदींना हुकुमशहा म्हणत हे नतद्रष्ट तरुण त्यांना शिव्या देत होते. मोदी जर हुकूमशाह असते तर हे तरुण त्यांना अशा मोकाटपणे सुसाट शिव्या देऊ शकले असते का ? यांना हुकूमशहा कसा असतो ते दाखवण्यासाठी अफगाणिस्तान, उत्तर कोरिया सारख्या देशांमध्ये पाठवायला हवे. हिटलरची कृत्ये वाचायला द्यायला हवी. तेंव्हा यांना लोकनियुक्त पंतप्रधान आणि हुकुमशाह यातला फरक कळेल. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की जो लोकशाहीचे तंतोतंत अनुसरण करतो. या देशाने कित्येक असे तरुण पहिले आहे ज्यांनी अल्पायुष्यात मोठी प्रगल्भता दाखवून महान कार्ये केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तोरणा किल्ला जिंकला तेव्हा शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते, 

उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहतां प्रत्यया आल्या । यथातथ्य ॥
शिव्या दिल्या की त्या अंतरात्म्याला जाऊन लागतात असे सांगणारे रामदास स्वामी ऐन तारुण्यात घर सोडून बाहेर पडले होते व जगाला दासबोध सारखा ग्रंथ दिला, वयाच्या तिशीत  अमेरिकेमध्ये हिंदू धर्माची पताका फडकवून, भारताचा नावलौकिक वाढवून स्वामी विवेकानंद 39 व्या इहलोक सोडून गेले होते, वयाच्या चाळिशीत महापराक्रमी बाजीराव पेशव्याने 41 लढाया जिंकून शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार केला होता, सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू या तरुणांनी ऐन तारुण्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते, प्राण दिले होते. अशा या तरुणांची यादी केली तर त्या यादीनेच कितीतरी पाने भरून जातील. अशा या तरुणांच्या देशात जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात काही तरुण-तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण-तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात वर उल्लेखलेले महान तरुण होऊन गेले ? असा प्रश्न या देशवासीयांना हे आंदोलन पाहून पडला.
     Gen  Z पिढीतील अनेक तरुण हे चांगल्या इमारती, भरमसाठ फी, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळा महाविद्यालयातून शिकलेले आहे. त्यापैकीच काही या आंदोलनामध्ये समाविष्ट होते. मग यांना खरोखरच चांगले शिक्षण मिळाले आहे ? यांनी जिथे शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्था भरमसाठ फी घेऊनही यांना एक आदर्श विद्यार्थी का घडवू शकल्या नाहीत ? की खरे विद्यार्थी हे घरीच होते व  आंदोलनकर्त्यांमध्ये मध्ये सर्व समाजकंटक आणि देशविघातक प्रवृत्ती होत्या ?  मोठमोठ्या शहरांमधील इंग्रजी शाळांमधून, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य मिळत आहेत का ? असे काही प्रश्न या आंदोलनातील काही तरुण-तरुणींना अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करतांना पाहून तमाम देशवासीयांना पडले आहे. 
         विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांचा सत्ता प्रवेशासाठी मार्ग म्हणून उपयोग करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना या देशातील जनता "ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर" असेच आज म्हणत असेल.

२८/०७/२०२६

Article about ideal teacher, head mistress Aney madam

जानेवालो की याद आती है..


आज गुड पॅरेंटिंग और स्कूल मे न डाटना, न मारना, विद्यार्थीयोको सजा न देना इस कारण Gen Z पिढी के कई युवा बिगड गये है|आज की पिढीमे अणे मॅडम जैसे आदर्श शिक्षक ज्यादा से ज्यादा संख्यामे हो ऐसी उम्मीद है |
ऐसे आदर्श शिक्षक जो बालकोमे, युवाओमे
नया जोश, नयी उमंग और देशभक्ती भर  दे |

कल शाम साडेचार पाच बजे के करीब व्हाट्स ॲटप के एक गृपमे एक दुखद संदेश दिखाई दिया | वो संदेश था राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका हम सब की चहेती प्रधानाचार्या वनमाला अणे इनके निधन का | संदेश पढा और मै शोकाकुल तथा स्तब्ध हो गया | संदेश की खातरजमा करने के लिए मैने वनमाला अणेजी के सहकारी रहचुके स्व. प्रल्हाद कोरडे के सुपुत्र मेरे बालमित्र राधेश्याम कोरडे को फोन कर पुछा तब राधेश्याम कोरडे ने इस वृत्त की पुष्टी की | फिर कई सारे सोशल मीडिया गृपपर उनके निधन की वार्ता आने लगी और मेरे साथ अणे मॅडम के कार्यकालमे ए.के. नॅशनल हायस्कूल के विद्यार्थी रह चुके मेरे कई दोस्त भी गमके सागर मे डूब गये| एक दुसरे को फोन करके मॅडम के निधन का शोक जताने लगे |आखिर अणे मॅडम मे ऐसा क्या था की विद्यार्थी  इतने शोकाकुल हो गये थे ? मै ये सोचने लगा और मुझे मेरे पाठशाला मे बिताये हुए दिन याद आने लगे | नॅशनल हायस्कूल की प्रधानाचार्या एक अनुशासनप्रिय और एक सच्ची शिक्षका है यह देखकर मेरे पिताजी ने मुझे उस स्कुलमे दाखिल कर दिया था | मै उस दौरमें चला गया | प्रधानाचार्य को पूरी स्कूल का कार्य देखना होता है इस वजह से शिक्षकों की तुलनामें उसका विद्यार्थियों से संबंध कम आता है|ऐसा होने के बावजूद भी अणे मैडम विद्यार्थियोंमे इतनी प्रिय कैसे हो गई ? इसका उत्तर मैं सोचने लगा |  फिर मेरे मन ने जबाब दिया,  कोई भी व्यक्ति उसका कर्म सच्ची भावना और निष्ठासे  करता है, अपने कार्य को व्रत मानकर आगे बढ़ता है तो फिर सन्मान और लोकप्रियता उसके कदम छुती है | लोगों का प्यार उसे मिलता है और लोकप्रियता अपने आप उसके पीछे चली आती है | अणे मैडम का वैसा ही हुआ | कर्तव्यपथपर वह आगे बढ़ती गई और एक दिन ऐसा आया कि उन्हे उस समयके राष्ट्रपति शंकरदयाल शर्मा इनके करकमलो द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार भी प्राप्त हुवा| 

     आजसे दस साल पहले मैने उन्हे एक पत्र लिखा था जिसका जवाब उन्होंने मुझे दिया था| उन्होने उनके जवाब में मेरी सरहाना कर मुझे आशीर्वचन दिये थे | मैने उन्हे जो पत्र लिखा था उसमें उनकी कई यादे लिखी थी| यहाँ वो लिखी तो उनकी पुनरावृत्ती हो जायेगी और वो मैं नही करुंगा |

(अणे मॅडम को लिखा हुआ पत्र पढणे के लिए यहा क्लिक करे)

लेकिन उस पत्रमें जो यादे नही लिखी थी वो जरूर लिखुंगा|मुझे याद है मॅडम जब ऑफिस मे बैठी हुयी रहती थी तब किसी भी विद्यार्थी की मजाल नही थी की वो ऑफिस के सामने से जाये,  इतना आदरयुक्त डर विद्यार्थीयो के मनमे रहता था | वैसेही जब मॅडम स्कूल सुरू होने के बाद पुरे स्कूल का एक चक्कर लगाती थी तो सभी कक्षाओमें पिन ड्रॉप सायलेन्स रहता था, और बरामदे मे ऐसा वातावरण रहता था जैसे मानो कर्फ्यू ही लगा हुवा हो | मुझे खुशी है की कक्षा पाचवी मे ही मेरा और मॅडम का परिचय हुआ था मै मेरी कक्षा का वर्गनायक था और मॅडम ने मुझे वर्गनायक का बॅज लगाकर मेरा सन्मान किया था | मॅडमसे जुडी हुई ऐसी कई यादे कई विद्यार्थीयोको भी होगी|

शिक्षा क्षेत्रमे आने के कारण मुझे कई बार शिक्षा अधिकारी बुलढाणा कार्यालय मे जाने का मौका मिलता है और वहाँ जाने के बाद मै जब वहाँ लगी हुयी आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त शिक्षको की सूची पढता हुं और उसमें  हमारी अणे मॅडम का नाम देखता हुं, तो मुझे बडा ही गर्व प्रतीत होता है, और मेरे दिल में मॅडम के प्रति जो आदर है वो और भी बढ जाता है |

हम खुशनसीब है की हमे अणे मॅडम जैसी प्रधानाचार्या और कई ऐसे आदर्श शिक्षक गण मिले जिनसे हमे बहुत कुछ सिखने को मिला | आज हमारे पुत्र-पुत्री Gen Z पिढी के युवा है जिनके अपने विचार है | जो मोबाईल युग मे पैदा होने के कारण उन्हे सही दिशा मिल नही रही है वो आभासकोही सत्यता मान रहे है | आज गुड पॅरेंटिंग और स्कूल मे न डाटना, न मारना, उन्हे सजा न देना इस कारण Gen Z पिढी के कई युवा बिगड गये है  | आज की पिढीमे अणे मॅडम जैसे आदर्श शिक्षक ज्यादा से ज्यादा संख्यामे हो, ऐसे आदर्श शिक्षक जो बालकोमे, युवाओमे नया जोश, नयी उमंग और देशभक्ती भर  दे |

 ऐसी उम्मीद रखते हुए यहाँ समापन करता हुं| 

जानेवाले कभी नही आते,

जानेवालो की याद आती है |

अणे मॅडम की भी याद उनकी कार्यप्रणाली, कर्तव्यपरायणतासे हमेशा आती रहेंगी | अणे मॅडम को भावपूर्ण श्रद्धांजली |