ये बॉम्बे शहर हादसो का शहर
है...

आर्थिक केंद्र असलेल्या शहरांचा बहुतेक भाग 2050
पर्यंत समुद्राच्या
पाण्यात असेल. भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर सुद्धा समुद्राच्या पोटात जाण्याची
भीती आहे. 7 बेटांचं शहर असलेल्या मुंबईतील कुलाबा हे भविष्यात विरारचा भाग होईल.
म्हणजे विरार पर्यंतचा सर्व भाग समुद्र गिळंकृत करेल. त्यामुळे भविष्यात सुरक्षित
अशी नवी शहरं वसवण्यावर भर द्यावा लागेल. परंतू या सर्व बाबतची तसेच
देशातील इतरही समस्यांबाबत विचार करण्यास इथल्या राजकारण्यांना वेळ मिळेल तेंव्हा ना
! येथे राजकारणाचा विशेष काही अनुभव नसतांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ,
त्यासाठी चढाओढ , एका पक्षाने काही केले तर त्यात दुसरा पक्ष आडवी टांग करतो , एकाच
पुलाचे दोन-दोन , तीन –तीन वेळा उद्घाटन, एकमेकांबाबत शिवराळ भाषेत चिखलफेक , सत्तेची हाव पूर्ण करण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्याउड्या मारणे, निव्वळ आमची मुंबई आमची मुंबई करायचे आणि मुंबईसाठी प्रत्यक्षात करायचे मात्र काही नाही. या सर्व बाबींतून आपल्या राजकारण्यांना आपला देश , आपली शहरे त्यातील नागरिकांच्या
समस्यांना फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे 2050 पर्यंत सुद्धा त्यांना वेळ मिळेल की नाही
याची निश्चिती नाही. तेंव्हा नागरिकांनीच दक्षता घेणे जरुरी आहे. मुंबईचा मोह टाळून
इतर शहरांत रोजगाराचे पर्याय शोधावे. 2050 चा विचार केला तर हे नैसर्गिक संकट आता केवळ 25-30 वर्षंच
दूर आहे. त्यामुळे धोकादायक अशा शहरांमधील लोकांनी इतरत्र स्थलांतरीत होण्याकडे
लक्ष द्यावे. सरकार वर विसंबून राहू नये.
1661 मध्ये सात वेग-वेगळी बेटे असलेले हे शहर ब्रिटनच्या राजकुमारासह आपल्या कन्येचा विवाह लावून देतांना पोर्तुगिज राजाने आंदण म्हणून भेट दिले होते. तद्नंतर इंग्रजांनी या शहराची सुंदर रचना केली. महानगरपालिका ,रेल्वे स्थानक सारख्या वास्तुशिल्पाचा नमुना असलेल्या इमारती बांधल्या. आपण मात्र हे शहर विद्रूप बनवले. त्या विद्रूपतेने येथे नेहमीच काही ना काही धोके अर्थात हाद्से होत असतात. त्यातच आता येत्या काळात हा समुद्रात बुडण्याचा “हादसा” मुंबई मधे येण्याची शक्यता आहे. व तो टळो ही मागणी ईश्वरा शिवाय करणार तरी कोणाला ?
1661 मध्ये सात वेग-वेगळी बेटे असलेले हे शहर ब्रिटनच्या राजकुमारासह आपल्या कन्येचा विवाह लावून देतांना पोर्तुगिज राजाने आंदण म्हणून भेट दिले होते. तद्नंतर इंग्रजांनी या शहराची सुंदर रचना केली. महानगरपालिका ,रेल्वे स्थानक सारख्या वास्तुशिल्पाचा नमुना असलेल्या इमारती बांधल्या. आपण मात्र हे शहर विद्रूप बनवले. त्या विद्रूपतेने येथे नेहमीच काही ना काही धोके अर्थात हाद्से होत असतात. त्यातच आता येत्या काळात हा समुद्रात बुडण्याचा “हादसा” मुंबई मधे येण्याची शक्यता आहे. व तो टळो ही मागणी ईश्वरा शिवाय करणार तरी कोणाला ?