Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/०३/२०१७

Article about killing female infant

कळ्यांचा कर्दनकाळ 

“यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी शिकवण असणा-या आपल्या देशाची गत आता “ यत्र धनस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी झाली आहे..............
......... रामकृष्ण परमहंस म्हणतात , “शिक्षक म्हणून आणि डॉक्टर म्हणून जर कोणी या जन्मात व्यवसाय करत असेल आणि तो जर योग्य पद्धतीने आणि प्रमाणिकपणे करत असेल तर त्यांना याच जन्मात मोक्ष मिळतो” परंतू मोक्ष, प्रमाणिकपणा यांना हल्ली कोण विचारतो ?

          सांगली जवळील म्हैसाळ या गावातील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करतांना झालेल्या मृत्यूमुळे आणि त्यासोबतच भारती रुग्णालयाच्या माध्यमातून झालेल्या अनेक स्त्री भृण हत्यांमुळे उभा महाराष्ट्र हादरला. एक मार्चला स्वाती जमदाडे या महिलेचा भारती रुग्णालयात मृत्यू झाला आणि डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे या त्या रुग्णालयाच्या संचालकाला अटक करण्यात आली. बी एच एम एस पदवी असलेल्या या डॉक्टरच्या रुग्णालयात खाटांची आणि शस्त्रक्रिया करण्याची साधने सुद्धा होती. अनेक स्त्री अर्भकांना याने यमसदनी धाडले आणि पुरून टाकले. “बेटी वाचवा बेटी जगवा” , “:बेटी बचाव बेटी पढाओ” असे शासन म्हणत असतांना व जनतेची सुद्धा मुलींकडे पाहण्याची मानसिकता बदलत असतांना नेमकी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रास काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस येण्यास सौ स्वाती जमदाडेंचा मृत्यू व्हावा लागला आणि तो होईपावेतो प्रशासनास वाट पहावी लागली हे एक दुर्दैव म्हणावे की प्रशासनाची लापरवाही ? पोलिसांनी जर कधी मनात आणले तर मंदेरा बाहेरची चप्पल सुद्धा चोरीला जावू शकत नाही एवढी पोलीसां जवळ माहिती असते. १९ स्त्री मृत अर्भक सापडण्या पर्यंत कुणास कसे ठावूक नाही याचे आश्चर्य वाटते. 10 वर्षांपासून तो हे रुग्णालय चालवीत आहे होमिओपॅथी डॉक्टर असूनही गर्भपात करीत आहे हे सर्व घडते म्हणजे यात अनेक लोकांचा सहभाग असेलच. आजपावेतो १९ अर्भक सापडली आहेत त्यांची संख्या अधिकही असू शकते. आजच त्याच्या कम्पाउंडर साळुंखे आणि नर्स रोजे यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.शासनाच्या योजना चांगल्या आहेत परंतू कायद्याचा धाक म्हणावा तसा नाही आहे. म्हणूनच खिद्रापुरे सारखे असे कृत्य करण्यास धजावतात. “यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी शिकवण असणा-या आपल्या देशाची गत आता “ यत्र धनस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी झाली आहे. मग धनासाठी काहीही करण्यास मागे-पुढे पहिले जात नाही , बेकायदेशीर कृत्ये त्यामुळेच घडत असतात. वैद्यकीय क्षेत्रात तर अशा अनेक घटना घडत असल्याचे सर्वानी अनुभवले आहे. मृतास “व्हँटीलेटर” वर ठेवून पेशंटच्या नातेवाईकांना फसवणे, उगाच विविध पॅथॉलॉजी टेस्ट करावयास लावणे, औषधांच्या मात्रा देण्यात चुका करणे, टेस्ट रिपोर्ट चुकीचे देणे असे कितीतरी किस्से अनेकांनी ऐकले आहेत. खिद्रापुरेने तर कहरच केला होमिओपॅथी डॉक्टर असूनही त्याने गर्भपात केले. तो होमिओपॅथी डॉक्टर तरी आहे की नाही हे आता तपासांती कळेलच. केवळ धनाच्या लालसेपाई हे असे घडते आहे दुसरे इतर काही कारण नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात , “शिक्षक म्हणून आणि डॉक्टर म्हणून जर कोणी या जन्मात व्यवसाय करत असेल आणि तो जर योग्य पद्धतीने आणि प्रमाणिकपणे करत असेल तर त्यांना याच जन्मात मोक्ष मिळतो” परंतू मोक्ष, प्रमाणिकपणा यांना हल्ली कोण विचारतो ? आता तर हवा फक्त पैसा . कोट्यावधी रुपयांचे ऋण घेऊन इस्पितळे, कोचिंग क्लासेस उभारली जातात आणि मग ऋण फेडण्यासाठी पेशंटला, विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते. अर्थात याला अनेक चांगली रुग्णालये व कोचिंग क्लासेस अपवाद आहेतच. परंतू खिद्रापुरेंसारख्या डॉक्टरमुळे समाजातील इतर चांगल्या डॉक्टरांची नावे सुद्धा बदनाम होतात. म्हैसाळ मधील नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवला. परंतू   महाराष्ट्रात कुठेही निदर्शेने , आंदोलने , मोर्चे झाले नाहीत. स्वत:च्या स्वार्थी मागण्यांसाठी , शासना कडून विविध लाभ मिळवण्यासाठी मोर्चे काढतांना आपण अनेकांना पाहतो परंतू समाजातील बेकायदेशीर कृत्ये करणा-यांच्या विरोधात मात्र असे मोर्चे क्वचितच निघतात. तेंव्हा यासाठी तर सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येऊन मोर्चा,निषेध,निदर्शने करावयास हवी. कळ्यांच्या खिद्रापुरे या कर्दनकाळास कठोरात कठोर शिक्षा करावी जेणे करून दुसरा कोणी पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.



Speech By Vinay V Varangaonkar on the occasion of Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary 2016

Speech By Vinay V Varangaonkar on the occasion of Mahatma Phule Deat Anniversary 2015

०२/०३/२०१७

BCCI decided to honour C K Naydu Lifetime Acheivement Award to ex cricket player, baller Padmakar Shivalkar.



जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
      कालच्या लोकसत्ता मध्ये खेळाच्या पानावर याच शीर्षकाची एक बातमी होती. देव आनंदच्या जगण्याच्या तत्वज्ञानाच्या “मै फिक्र को धुएमे उडाता चला गया” या गाण्यातील एक अंतरा शीर्षकातील याच ओळीने सुरु होतो.लहानपणापासून कधी चिंता निर्माण झाली तर आमचे तिर्थरूप याच गाण्याचा दाखला देत आम्हाला कधीही चिंता न करण्याचे सांगत आले आहे.त्यामुळे हे गाणे तसे पाठच आहे. साहीर लुधियानवीने लिहिलेले व जयदेव ने संगीतबद्ध केलेलं हे एक हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील “माईलस्टोन” म्हणावे असे अप्रतिम गीत आहे. या गीतात सर्वच सौंदर्य एकवटले आहे साधना,देव, जयदेव,साहीर,दिग्दर्शक विजय आनंद.अशा या सुमारे 50 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हम दोनो चित्रपटातील गीताची ओळ बातमीचे शीर्षक असलेली पाहून बातमी वाचण्यास घेतली.बातमी होती “पद्माकर शिवलकर” यांची.उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या पद्माकर शिवलकर यांना “बी सी सी आय” ने क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हे बातमी वाचल्यावर समजले.पद्माकर शिवलकर मुंबई कडून खेळणारे  डावखुरे गोलंदाज होते.वीस वर्षे ते मुंबई संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले.सर्वाधिक विकेट घेणारे ते गोलंदाज आहे. त्यावेळेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज असून सुद्धा त्यांची निवड भारतीय क्रिकेट संघात कधीही होऊ शकली नाही हे त्यांचे आणि भारतीय क्रिकेट संघाचे सुद्धा दुर्दैव म्हणावे लागेल.त्यावेळी त्यांच्या ऐवजी बिशनसिंग बेदी यांची निवड करण्यात आली होती. ती कशी झाली तो भाग वेगळा.

“हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळूनी कोणाचे जीवन उधळी , दे कुणास यश उधळोनी”

या शिवलकरांनीच गायलेल्या गीताप्रमाणे शिवलकर यांच्या दैवगतीच्या चेंडूने मात्र त्यांच्या भारतीय संघातील प्रवेशास मात्र हुलकावणी दिलीच.खेळाडू मग ते क्रिकेट वा अन्य कोणत्याही खेळातले असू देत त्यांची निवड ही पूर्णत: दैवावरच अवलंबून असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुणवत्ता असून सुद्धा आपल्या देशातील अनेक खेळाडू मागे का राहिलेत ? कसे राहिलेत ? क्रिकेटमध्ये तर तीव्र स्पर्धा असते एखादा गुणवंत खेळाडू त्याचे संपूर्ण जीवन झोकून एखाद्या खेळासाठी देतो आणि जर त्याच्या ऐवजी कुण्या दुस-याची निवड होत असेल तर ती किती  वेदनादायी असते हे तो खेळाडूच जाणू शकतो. इतर कुणी त्याचे दु:ख समझू शकत नाही. पद्माकर शिवलकर सुद्धा असेच दु:खी झाले असतील. परंतू त्यांनी सकारात्मक दुर्ष्टीकोन ठेवला आणि खेळतच राहिले वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत. कुणाशीही तक्रार नाही की दु:ख उगाळत बसले नाही.
 
“कबीरा खडा बाजार्मे मांगे सबकी खैर
ना काहू संग दोस्ती ना काहू संग बैर”

या कबीराच्या उक्तीप्रमाणे शिवलकर राहिले. ते बरे आणि त्यांचे क्रिकेट बरे. कुणी कितीही अन्याय करो वा कुणावर कितीही अन्याय होवो नियती मात्र अन्याय होणा-यावर अन्याय होवू देत नाही. नियती त्या अन्याय होणा-या व्यक्तीची दखल घेतेच किंवा घ्यायला भाग पाडते.एखादा व्यक्ती किंवा संस्था कुणावर अन्याय करीत असेल तर त्या व्यक्तीला किंवा संस्थेला ते ज्ञातच असते आणि कधी ना कधी त्याचे मन, अरबीत फार चांगला शब्द आहे “जमीर” त्याला “तू अन्याय केला आहेस “ हे सांगतेच आणि मग त्याला स्वस्थ बसवत नाही.त्याप्रमाणेच घडले बी सी सी आय या संस्थेचा चा “जमीर” इतक्या वर्षानी जागृत झाला असेल असेच म्हणावे लागेल आणि म्हणून त्यांनी पूर्वी अन्याय झालेल्या पद्माकर शिवलकर यांना परवा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. क्रिकेट रसिकांच्या विस्मृतीत गेलेले नांव पद्माकर शिवलकर पुन्हा प्रकाश झोतात आले. माध्यमांनी त्यांना दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी सांगितली. “इतक्या उशीरा तुमची दखल घेतली गेली तुम्हाला काय सांगावेसे वाटते ?” असा प्रश्न विचारला असता या साध्या,देव आनंद सारख्या उत्साही आनंदी माणसाने सकारात्मक आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणा-या देव आनंदच्या गीताची ओळ गायली “जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया”.त्यांनी दिलेल्या अशा उत्तराने त्यांची प्रतिमा अधिकच उजळली.