आठवण चित्रपटांच्या
जाहीरातीची



काल
अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने
गौरवले जाणार आहे असे वृत्त झळकले. देशविदेशात करोडो अबालवृद्धांच्या या आवडत्या
अभिनेत्याला हा पुरस्कार मिळणे ही सर्वांची मनोमन इच्छा होतीच. कारण या
पुरस्कारासाठी तो Deserving आहेच. भारतीय जनमानसाच्या ह्र्द्यसिंहासनावर अमिताभ
गेली कित्येक वर्षे अनभिषिक्त सम्राटा प्रमाणे राज्य करीत आहे. त्याच्या उतरत्या
वयातही त्याची क्रेझ आहे. वाल्मिकीचे रामायण, गदिमांचे गीत रामायण आणि
भविष्यात “अमिताभायण” सुद्धा लिहिले जाऊ शकते.
का नाही लिहिले जाऊ शकणार ? कारण त्याचे गारुड, त्याची मोहिनी
अबाल वृद्धांमध्ये गेल्या 47 वर्षांपासून कायम
आहे. “ये पुलिस
स्टेशन है तुम्हारे बाप
का घर नही” म्हणत जंजीर
मध्ये आपला राग प्रकट करणारा , सतत कार्यशील राहणारा
अमिताभ “देवी और सज्जनो”
असे आजही
“केबीसी” मध्ये म्हणत आपला कारेश्मा
राखून आहे. काल त्याला दादासाहेब फाळके सन्मान प्राप्त होणार
ही बातमी आली. माध्यमांवर संदेशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली
झाली. म्हणूनच अमिताभ विषयी
पुनश्च काहीतरी लिहिण्याची इच्छा झाली. अमिताभायण या शीर्षकानुसार म्हटले तर अमिताभवर
एक भलामोठा ग्रंथच
लिहावा लागेल. तूर्तास नाही अमिताभायण ग्रंथ तर निदान एक लेख तरी लिहावासा
वाटला. “कामयाबी की सिडी” पटापट चढत लोकप्रियतेचे
सर्व उच्चांक अमिताभने मोडले. त्याच्याशी तुलना करू पाहणारे सर्व “किंग” ,”बादशाह” आजही त्याच्या मागेच आहेत कारण “हम जहॉं खडे होते है लाईन
वहीं से शुरू होती है” अशी संवादफेक त्याने
कित्येक वर्ष आधी केली आहे. आणि खरच आजही लाईनमध्ये प्रथमस्थानी तोच आहे, सुपरस्टार आहे. सुरुवातीला अपयश मग सलीम-जावेद, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा इ सहका-या समवेत अनेक हिट सिनेमे अमिताभने दिले.
त्याच्यासाठी गायलेली किशोर कुमारच्या आवाजातील गाणी आजही लोक तितक्याच आवडीने
ऐकतात. डॉन सिनेमा आजही तितकाच ताजा वाटतो. नेहमी म्हटले जाते की सर्वात मुख्य काम
असते दिग्दर्शनाचे परंतू डॉन चा दिग्दर्शक चंद्रा बारोट होता किती जणांना माहीत
आहे? चंद्रा बारोट ने पुढे किती हिट सिनेमे दिले त्यासाठी शोध मोहीम हाती
घ्यावी लागेल. “सबकुछ अमिताभ” अशी स्थिती होती. उंच आहे म्हणून आमच्या कॅमेरात बसणार नाही, आवाज चांगला नाही असे म्हणून प्रथम हिणवल्या गेल्यावरही त्याने
त्याच्या त्याच बाजू जमेच्या म्हणून सिद्ध केल्या, ”पीटर तुम मुझे बाहर ढूंड
रहे थे और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था” हा संवाद कुणा इतर
अभिनेत्याच्या आवाजात ऐकण्याची कल्पनाच करवत नाही. “केबीसी” मध्ये सहभागी 
सणासुदीचे दिवस आहेत.
रस्त्याने दूर्वा , फुले , आंब्याची पाने , केळीची पाने इ. मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दिसत आहेत. हे सर्व देवाला
अर्पण होणार. ही सर्व दुकाने पहात असतांना या सर्वांचे काही दिवसांनी होणारे
निर्माल्य डोळ्यासमोर दिसू लागले. मनात भय उत्पन्न झाले की आता पुन्हा विहीरी , नद्या , तलाव , धरणे इ. जलाशये
या निर्माल्याने पुन्हा भरणार. गत उन्हाळ्यात जनता भीषण पाणी टंचाईला सामोरी गेली.
जात आहे. भविष्यही तसेच असणार आहे. तरीही विहीरीमध्ये पूजेचे विसर्जन, निर्माल्य टाकतांना कुणाला काही वाटत कसे नाही?
उन्हाळ्यात प्रशासनाने , सामाजिक संघटनांनी विहीरी , तलाव यांची सफाई केली. जनतेने सुद्धा आपल्या ऐपतीनुसार आर्थिक मदत केली.
परंतू तरीही निर्माल्य विसर्जन हे चांगल्या निर्मळ पाण्यात होतांना दिसत आहे.
खामगांवचेच दाखले द्यायचे झाल्यास जिजामाता मार्ग, कोर्टा
जवळील विहीर तरुणांनी साफ केली. त्याच विहीरीत हरतालिकेच्या दुस-या दिवशीच निर्माल्य, केळीचे खांब तरंगताना दिसून आले. याला काय म्हणावे ? सिव्हील लाईन्स मधील मोठी विहीर नगर परीषदेने साफ केली. त्यातही कचरा
टाकणे सुरू झाले. विशेष म्हणजे या दोन्ही विहीरी चांगल्या सुशिक्षित लोकांच्या
परीसरात आहे. पूर्वी प्रत्येक परीसरात एखादा कडक स्वभावाचा व्यक्ती असायचा त्याने
आवाज दिला की कुणीही असे कचरा निर्माल्य टाकण्यास, झाडांची
फुले तोडण्यास धजावत नसे. त्यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागत असे. आता तसे
व्यक्तीही राहीले नाही. असले तरी ते बोलत नाही कारण कुणी कुणाला जुमानत नाही.
म्हणूनच चांगले पानवठे निव्वळ कचरा कुंड्या बनत आहेत. जनुना तलावाचे रोटरी क्लबने
साफसफाई व गाळ काढणे हे मोठे कार्य तडीस नेले. परंतू त्याठिकाणी गेलो असता अनेक ठिकाणी
कचरा ,निर्माल्य , देवतांचे जुने फोटो टाकलेले दिसले. ज्या विहीरींनी, ज्या तलावांनी वर्षानुवर्षे